देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

दिल तो पागल है’ २८ फेब्रुवारीला पुन्हा रिलीज होणार

मुंबई – यशराज फिल्म्सने या रोमँटिक महिन्याचा शेवट ‘दिल तो पागल है’च्या पुनःप्रदर्शनाने खास करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा ब्लॉकबस्टर सिनेमा २८ फेब्रुवारीला पुन्हा थिएटरमध्ये झळकणार आहे.

दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट ठरला होता.

‘दिल तो पागल है’ने पुरस्कार सोहळ्यांवरही वर्चस्व गाजवलं. या चित्रपटाने ३ राष्ट्रीय पुरस्कार, ७ फिल्मफेअर पुरस्कार आणि अनेक सन्मान पटकावले.

हृदयस्पर्शी संगीत, मनमोहक डान्स सिक्वेन्सेस आणि अमर संवादांसाठी प्रसिद्ध असलेला हा सिनेमा अजूनही बॉलीवूड प्रेमकथांचा एक कल्ट क्लासिक मानला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button