
मुंबई ( हर्षदा वेदपाठक ) – बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा अलीकडेच एका गंभीर अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांना बंदुकीची गोळी लागली होती. मात्र ईश्वराच्या कृपेने आणि आई बाबाच्या आशीर्वादाने ते पूर्णपणे सुरक्षित राहिले असे ते सांगतात.
हर्षदा वेदपाठक यांनी सांगितले की, ही घटना गोविंदांसाठी एका नव्या आयुष्याची सुरुवात ठरली. गोविंदांनी स्वतः याला एक चमत्कार म्हटले. ते सांगतात, “माझ्या डोक्यावर आई बाबा आणि गणपती बाप्पांचा हात आहे तोपर्यंत कोणतीही अनिष्ट घटना मला स्पर्श करू शकत नाही.”

ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत तसेच गोविंदाच्या चाहत्यांमध्ये त्या नंतर जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक दिग्गज कलाकारांनी याला “ईश्वराचे वरदान” म्हटले आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पोस्ट करून लिहिले की, गोविंदांचे जीवन म्हणजेच बाप्पांचा आशीर्वाद आहे.
गोविंदा नेहमीच धार्मिक आस्थेने बाप्पाच्या चरणी माथा टेकताना दिसतात. या घटने नंतर त्यांची देवावरील श्रद्धा अधिक दृढ झाली असल्याचे स्पष्ट केले.

९० च्या दशकातील सुपरस्टार असलेले गोविंदा आजही आपल्या नृत्य, विनोद आणि खास अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. त्यांच्या चाहत्यांच्या मते, भारतीय सिनेसृष्टीसाठी त्यांची उपस्थिती अमूल्य आहे आणि त्यांची संकटातून सुरक्षित सुटका होणे हे लाखो चाहत्यांच्या प्रार्थनेचे फलित आहे.

गोविंदा आणि त्यांच्या 38 वर्षे त्यांची संगिनी राहिलेल्या सुनीता यांच्यामध्ये फारकत होणार या बातमीबद्दल त्यांना विचारता, गोविंदा स्पष्ट करतात माझ्या आयुष्यात एकच स्त्री आहे आणि ती म्हणजे माझी पत्नी आणि आमच्या मध्ये तफावत किंवा फारकत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार हे सांगायला देखील ते विसरत नाही. गोविंदा यांच्या स्पष्टीकरणानंतर सुनिता आणि गोविंदा मध्ये घटस्फोट होणार या बातमीवर तरी आता विराम पडला आहे.



